का घालतात महिला पायात जोडवे ..

का घालतात महिला पायात जोडवे ..

कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पहिले, की तो विवाहित असेल किंवा नाही, हे खात्रीपूर्वक सांगता येणे तसे कठीण असते. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली, की ते धारण करणारी महिला विवाहित असते, हे ज्ञान सर्वमान्य आहे. पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षणे नसून, ते धारण करण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत. ती कारणे लक्षात घेता, आपल्या पूर्वजांनी किती विचार करून काही पद्धती सुरु केल्या हे आपल्या लक्षात येईल. पायांच्या बोटांमध्ये जोडवी घालण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत.

👉  आजकाल पायांच्या कुठल्याही बोटांमध्ये जोडवी घालण्याची फॅशन आहे.

👉  तऱ्हेतऱ्हेची जोडवी आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण परंपरेनुसार पायांच्या अंगठ्यांच्या शेजारील, म्हणजेच दुसऱ्या बोटामध्ये जोडवी घातली जायला हवीत.

👉  पायांच्या अंगठ्याशेजारील बोटामध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी आहे. ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाब ही संतुलित ठेवते.

👉  ह्या नसेवर, पायांमध्ये जोडवी घातल्याने दबाव पडतो, व त्यामुळे या नसेशी निगडीत अवयवांचे कार्य सुरळीत चालते.

👉  पायांमध्ये ज्या बोटांमध्ये जोडवी घातली जातात, त्या बोटामध्ये असलेल्या नसेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. त्यामुळे पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने महिलांच्या शरीरेतील प्रजनन क्षमता चांगली राहते.

👉  तसेच जोडव्यांमुळे सायटिक नर्व्ह वर दबाव येऊन त्याच्या आसपासच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारून गर्भाशय, मूत्रपिंड आणि आतड्यांमधील रक्तस्राव सुरळीत राहतो.

👉  पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रजनेन्द्रीयांचे कार्य सुरळीत चालत राहून, मासिक धर्म नियमित होतो.

👉  तसेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे.

👉 चांदी ऊर्जावाहक आहे. त्यामुळे जमिनीतली ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येते. त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह, व स्फूर्तीचा अनुभव होतो. तसेच दोन्ही पायांच्या बोटांमध्ये जोडवी असल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?