Kitchen Tips

Kitchen Tips :

उन्हाळ्यात अन्न टिकवण्यासाठी काय घ्यावी काळजी ?

👉 अन्न नेहमी हवाबंद डब्यातच साठवून ठेवा. उष्णता, हवा आणि दमटपणापासून अन्न दूर ठेवा.

👉 न चिरलेल्या भाज्या उघड्यावर ठेवल्यास त्यातली पोषकद्रव्ये, महत्त्वाची जीवनसत्त्वे नष्ट होतात. परिणामी भाज्या फ्रिजमध्ये ठेवताना हवाबंद डब्यात ठेवा.

👉 शिजवलेले मांस हवाबंद डब्यात ठेवल्यास चार ते पाच दिवस फ्रिजमध्ये अगदी सहज टिकतं.

👉 कच्च मांस साठवायचं असेल तर ते हवाबंद डब्यात घालून फ्रिजरमध्ये ठेवा. शिजवण्याआधी काही काळ फ्रिजबाहेर काढून ठेवा.

👉 उन्हाळ्यात फळं लवकर खराब होतात. त्यामुळे ती न धुता फ्रिजमध्ये ठेवा. तीन ते चार दिवस अगदी सहज टिकतील.

👉 उरलेला ब्रेड खराब होऊ नये यासाठी हवाबंद डब्यात फ्रिझरमध्ये ठेवा. खाण्याच्या १५ मिनिटे आधी तो बाहेर काढून ठेवा. ओव्हनमध्ये गरम केल्यास ब्रेड छान लुसलुशीत होईल.

👉 ताजे मासे एखादा-दुसरा दिवस फ्रिजमध्ये टिकतात. मासे जास्त काळ साठवून ठेवायचे असतील तर हवाबंद डब्यातच ठेवा.

👉 आंब्यांचा मौसम सुरू होत आहे. आंब्याचा रस काढून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हा रस अगदी कधीही काढून खाता येईल.

इतर काही महत्वाच्या टिप्स

👉  भेंडीची भाजी करताना त्यात दही घातल्याने भाजी चिकट होत नाही

👉 जास्त लिंबाच्या रसासाठी पाच ते दहा मिनिटं लिंबू कोमट पाण्यात भिजवावं.

👉 सुकं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खराब होत नाही

👉 फळभाज्या मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्याने टवटवीत होतात.

👉 शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात मीठ टाकल्याने साल लवकर निघतात.

👉 साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यात चार ते पाच लवंग ठेवाव्यात.

👉 भजीच्या पीठामध्ये मक्याचं पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात.

👉 कच्ची केळी ठंड पाण्यात ठेवल्याने आठवडाभर टवटवीत राहतात.

👉तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.

👉 भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतलं मीठ टिकून राहतं.

👉 तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.

👉 डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.

👉 चिमटीभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.

👉 पुऱ्यांच्या कणकेत साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.

👉 लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.

👉 पालेभाज्या सुकल्यावर पाण्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यास भाज्या ताज्या होतात.

👉 कोफ्टा किंवा इतर पदार्थ तेलात तळताना थोडं मिठ घालावं. जेणे करून तेल त्या पदार्थात सोसलं जात नाही.

👉 कडुनिंब शिल्लक असल्यास तो तळून डब्यात भरून ठेवल्याने जास्त काळ टिकतो.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.