नक्की विचार करा...

😡 राग आला तर आला😡
         खालील प्रश्नाची
             उत्तरे द्यावी

1) भारतात 33 करोड देव आणि लाखो बुवा बापु आहे मग भारत गरीब का आहे?

2) गणपती आणि सरस्वती विद्येची देवता आहे मग भारतात निरक्षरता का आहे?

3) भारतात ज्योतिष भविष्य सांगतात मग भुकंप, पुर, दहशतवादी हल्ले होतात मग ह्या ज्योतिषांना हे का नाही समजत?

*4) उपवास करुन मनोकामना पुर्ण होतात मग भारतात करोडो लोक उपाशी आहेत ज्यांना दोन वेळेच जेवण मिळत नाही मग त्यांना देव का प्रसन्न होत नाही?*

5) नवस करुन जर मुल होत असतील तर नवरा करायची गरज काय असे संत तुकाराम का म्हणतात?

6) तिर्थक्षेत्री दगड धोंडा पाणी असे संत तुकाराम का म्हणतात?

7) देव दर्शन करुन आल्यावर वाटेत गाडीला अपघात होऊन भक्त मरतात देवाच्या मंदीरात चेंगराचेगरी होऊन लोक मरतात मग *देव त्यांना का वाचवित नाही?*

8) देव चोरीला जात नाही फक्त _*दानपेट्या चोरीला जातात असे का?*_

9) मराठा, ओबीसी, एससी, एसटी लोकांच्या अंगात देव येतो मग ब्राम्हणाच्या अंगात देव का नाही येत?

10) देव आजार बरा करतो मग डाँक्टराकडेआपण का जातो?

11) देव आहे मग चोरी, बलात्कार, खुण का होतात?

12) सर्व 33 कोटी देवांनी भारतातच का जन्म घेतला? इतर देशात का नाही?

13) देवांना पोलिस संरक्षण का असते? देव स्वताच रक्षण का करु शकत नाही?

14) नवस करुन नोकरी मिळत असते मग अभ्यास करायची मेहनत करायची गरजच काय?

15) तिर्थक्षेत्रात भ्रष्टाचार केला जातो मग देव त्यांना शिक्षा का देत नाही?

16) देव सर्व काही देतो मग काम करायची गरज काय?

17) देवाच्या मंदीरा बाहेर भिकारयांची रांग का? 

वाट पहात आहे
तुम्हच्या उत्तराची
    परत वाचा

🤔🤔🤔

डार्विन च्या  सिंधातानुसार माकडा पासून  माणूस  झाला  हे  संपूर्ण  जग  मान्य करत आदि  मानव  नग्न राहायचा, आणि त्या  नंतर  किती  तरी शतका नंतर  कापडाचा  शोध  लागलाय  मग  माझा  सरळ  आणि  सोपा  प्रश्न ??
*देवाच्या अंगावर  कपडे कसे?*
कारण कापडाचा  शोध  आदिमानवा नंतर  लागलाय.

*मग देवाने  माणूस  निर्माण  केला  कि  माणसाने  देव ?*


तुम्ही म्हणता  रामायण आणि महाभारत  अति  प्राचीन  आहे.

मग धातू युग याचा  कार्यकाळ कधीचा आणि  मग  रामायण  महाभारतात, लोखंडी  भाले आले कुठून?

*चक्राचा शोध कधी लागला?*

तो तर  इसवीससना नंतर लागलाय मग रामायण आणि महाभारत अची प्राचीन  असेल  तर  रथाला  चाके कशी  काय????

रामायणात वानर पूल बांधतात आणि दगडावर राम अस लिहील तर पाण्यावर दगड तरंगतात हे तात्पुरत मान्य केल तरी  वानर लिहायला कुठल्या शाळेत गेली होती?

तसा उल्लेख असेल तर सांगा मग, हनुमान  पर्वत  उचलून  आणतो  तर सगळी वानर  सेना  उचलून  का  नेली  नाही  ????
वानरांना त्रास द्यायचं  कारण  काय ????

या जगात  अगदी फुला चा  जन्म  स्त्री केसर  आणि  पुकेसर एकत्र  आल्या शिवाय  होत  नसेल  तर,

*ब्रम्ह देवाच्या  बाहू मधून क्षत्रिय लोकांचा  जन्म  होतो  हे कस  शक्य  आहे ?*

*या जगात  मादी  जात  पिलाला  जन्म  देते  ब्रम्ह  देव  तर  पुरुष आहे.*

नारद  मुनी  ची  आई  सरस्वती, सरस्वती चा  बाप  ब्रम्हा..

*मग  नारद मुनी  ब्रम्ह  देवाचा  पुत्र  कसा??*
बापाची  मुलगी  बहिण असणार  ना  ????
मग  बहिण  आई  कशी???

ब्रम्ह देवाच्या  मुलीचा  मुलगा  ब्रम्ह  देवाचा  नातू  असायला  हवा  मग नारद  मुनीचा  बाप, ब्रम्ह देव कसा?

*इसवीसनाच्या पाचव्या शतकात आर्य भटाने [०]शून्याचा शोध  लावला.*

तर मग रावणाला  १०  तोंड होती  हि  कुणी  मोजली?

कारण  एकवर शून्य दिल्या  शिवाय  दहा  कसे  होतील  आणि  महाभारतात तर कौरव १०० आहेत येथे तर दोन  शून्य आहेत  आणि  अस  असेल  तर  *खर  कोण ? आर्य भट का रामायण  कि  महाभारत??????*

*आणखी  एक  प्रश्न आदिमानवापासून  आजचा  माणूस  तयार झाला   हे विज्ञानाणे मान्य केल आहे मग  आदिमानवाची  जात  कुठली  आणि  धर्म  कुठला ?????????*

या सर्व भाकडकथा, पुराण वाचून हसु येईल पण सत्य हेच की,
Conclusion -
* देवाची निर्मिती मानवानेच केली..*
*मानवानेच जात, धर्म निर्माण केले..*

✍स्वप्निल भिवाजी आव्हाड, माळवाडी. सिन्नर. नाशिक✍

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?