यालाच प्रेम म्हणायचं असत...

यालाच प्रेम म्हणायचं असत...

यालाच प्रेम म्हणायचं असत.

उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.

एकमेका आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.

थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत.

कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.

शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.

तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.

कवि : _______
स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?