बालपण...

बालपण...

माझं हरवलेलं बालपण
आजही आठवून पाहतो आहे
या मोठयांच्या गर्दीत
स्वत:लाच कुठेतरी शोधतो आहे

त्या निरागसतेची
आता खरी खूण पटते
त्या निर्व्याज हास्याची
आता खरी गरज वाटते

आता प्रत्येकाशी
वेगळा हिशेब मांडून बसतो
समोर कुणीही असला तरी
गरज पाहूनच थोबाड ताणतो

शब्दांनाच देत शब्दांचे विळखे
उभारतो शब्दांचेच इमले
या शब्दांच्या खेळत
माझे सारे जगच थांबते

डाव अनेक मांडून बसतो मी
खरेपणाने काही खेळता येत नाही
हरण्यातली गोडी कसली
जिंकण्यातला आनंदही मला गवसत नाही

परत एकदा लहान व्हायचं आहे
पण काही होता येत नाही
आिण या मोठयांच्या जगात
मला कुणी आपलेसे वाटत नाही

कवि : _________
स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.