उगाच नको...

उगाच नको...

उगाच नको
माझे शब्द हरवून गेले
माझे मला फ़सवून गेले
अतःकाळच्या वेदना जणु
अशा जखमा रूजवून गेले

आता बोलणार कोण ?
रूसणार कोण? हसणार कोण ?
गेले काय राहिले काय
उधळला डाव हिशोब मांडणार कोण?
एकदा आले पक्षी दोन
भेटून उडाले दिशांना दोन
दोन घडीची संगत त्यांची
जीव गुंतला का सांगे कोण

उडतांना ते सांगून गेले
आयुष्याचे ओझे करायचे नाही
जगायचे नाटक करायचे नाही
पुन्हा भेटण्यास चुकायचे नाही

पहा ओठावरती आले हासू
कात टाकूनी जन्मा येऊ
शब्द आता शोधुन काढू
त्यांना नवे रूप देऊ

पहा फुटले नवे धुमारे
भरली पुन्हा पानेच पाने
जन्मा आले हे गीत पहा
फुलले स्वप्न मनी पहा

झटकून टाकली जळमटे
मातीतून नवा कोंब फ़ुटे
जिंकले कोण हरले कोण
हिशोब आता उगाच नको

कवी:-________________
-@ स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर. @

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?