उष्णतेपासून वाचण्यासाठी खा हे पदार्थ...

👉 उष्णतेपासून वाचण्यासाठी खा हे पदार्थ...

मे हा उन्हाळ्याचा शेवटचा महिना. या महिन्यात उकाडा व ऊन याचा तडाखा सर्वात जास्त असतो. यामुळे अनेक शारीरिक तक्रारी जाणवतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणं आणि आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अशावेळी कोणते पदार्थ खावेत याबद्दल जाणून घेऊ...

👉 आंबा : आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा शरीरातील उष्णता वाढवते मात्र, रोज आंबा खाणे गरजेचे आहे. आंब्यामुळे शरीराला 'ब' जीवनसत्वाचा पुरवठा होतो.

👉 माठातील पाणी : माठाला गरिबांचा फ्रिज म्हणतात. फ्रिज येण्यापूर्वी माठाचा वापर सर्वात जास्त केला जात होता. माठातील थंड पाण्याचं सेवन करणं उन्हाळ्यात फायद्याचं असतं. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम माठातील पाणी करत असते.

👉 दूध गुलकंद : गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनलेला गोड पदार्थ म्हणजे गुलकंद. दूध गुलकांदामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध-गुलकंद घेणं आवश्यक आहे.

👉 दहीभात :  दह्याचं सेवन पोटासाठी उत्तम असतं. दहीभात खाण्यामुळे शरीरातील शर्करेचं प्रमाण योग्य राहते तसेच दहीभाताने पचनाक्रियाही सुधारते.

👉 कोकम सरबत : कोकमला मँगोस्टीन म्हणूनही ओळखलं जातं. दुपारच्या जेवणाआधी, सकाळी अकराच्या सुमारास, एक ग्लास सब्जायुक्त कोकम सरबत पिल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतात.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.