*|| फक्त तू खचू नकोस ||*

Nice poem:
   *|| फक्त तू खचू  नकोस ||*

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं ..?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड ...
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस ...
       सूर्य रोजच उगवतो,
       त्याच  नव्या तेजाने ...
       रोज मावळतीला जातो
       रोजच्याच् नेमाने ...
       येणे जाणे रितच् इथली,
       हे तू विसरु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस ...
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी लोक आहेत ...
तुझ्यासाठी जोडणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड हसुन बघ ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस ...
       वाट तुझी बघत असतं,
       रोजच  कुणीतरी ...
       तुझ्यासाठी जगत असतं ,
       आस लावून प्रत्येक क्षणी ...
       त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
       अश्रु तू गाळु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस ...
उठ आणि उघडून डोळे ,
पहा जरा  जगाकडे ...
प्रत्येकाच्या आयुष्यात ,
काहीतरी असतेच् थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच कुढत तू बसु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस ...
       सामर्थ्य आहे हातात जर, 
       स्वप्ने डोळ्यात घेऊन चल ...
       परिस्थितीशी भिडवून छाती,
       दोन हात करत चल ...
       विजय तुझाच असेल
       तेव्हा मागे वळून बघु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस ...

   🌹‼ *काळजी घ्या* ‼🌹

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?